By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' म्हणत,अंजली राणादाची सायकल सफर

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. पण या मालिकेत सध्या नवीन ट्विस्ट आहे. ते म्हणजे मॅनेजरबाई. त्यांनी राणादावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि राणादा वैतागून गेला आहे.

[video width="640" height="512" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/08/akshayaddr_37992208_252068758742191_6832462750757683200_n.mp4"][/video]

राणादाच्या चमचमीत चिकन खाण्यावर बंदी आणल्यानंतर आता मॅनेजरबाईंनी सायकलकडे मोर्चा वळवला आहे, त्यांनी राणाला सायकल चालवायला सांगितली आहे आणि तीसुध्दा सलग 20 किलोमीटर. राणादाला याचा प्रचंड राग आला आहे, पण सायकल चालवण्याशिवाय त्याच्याकडे आता कुठला पर्यायच नाही. चिडलेल्या राणादाला सायकल चालवताना पाठकबाई म्हणजेच अंजली भेटते, मग काय वैतागून तो मॅनेजरबाईंची त्यांच्याकडे तक्रार करतो.पण उलट अंजलीच त्याच्याकडे सायकलवर फेरफटका मारण्याचा हट्ट धरते.

 

मग काय, या शिक्षेमुळेच दोघांना एकत्र सायकल सफर करता येते, ते दोघं याचा कसा आनंद घेतात, त्यांच्या नात्यात कशी रंगत येते? आणि पुढे मॅनेजरबाई आणि राणादा यांच्यात काय नाट्य घडते हे पाहण्यासाठी पाहात राहा, तुझ्यात जीव रंगला संध्याकाळी 7.30.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive