By  
on  

शेवंताच्या मनात सुडाचा अंगार, भोवणार का नाईक कुटुंबाला?

लॉकडाऊनंतर पुन्हा मालिकांचं शुटिंग सुरु झालं आहे. प्रेक्षकांच्या भेटीलाही नवे एपिसोड्स येत आहेत. प्रेक्षकांच्या लाडक्या रात्रीस खेळ चाले मालिकेच्या शुटिंगलाही सुरुवात झाली आहे. लॉकडाऊननंतर या मालिकेच्या भागांमधील रंजकता अधिक वाढली आहे असं म्हणलं तर हरकत नाही.     

 

 

पण आण्णांनी शेवंताशी लग्न केलं खरं पण त्याला लग्नाने जणू तिचं जगणं मुश्कील करून टाकलं. आण्णांनी तिला नाईक वाड्यातही येण्यास मनाई केली आहे. याशिवाय तिचा जीव घेण्याची धमकीही तिला आण्णा नाईकांनी दिली होती. नेने वकिलांसमोर आण्णा शेवंतला उडवून लावतात. हे ऐकून शेवंता आण्णांवर सुड उगवण्याचं ठरवते. या प्रोमोच्या शेवटी शेवंताचा मळवटमधील लूक समोर येताना दिसतो आहे. हा लूक पाहून पहिल्या पर्वाच्या भागात शेवंताने आत्महत्या करताना घेतला असल्याचं माई सांगतात. त्यामुळे मलिकेचा शेवट तर नाही ना अशी शंका प्रेक्षकांना येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive