'चला हवा येऊ द्या’फेम विनोदवीर, अभिनेते भारत गणेशपुरे म्हणजे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेलं नाव. संपूर्ण महाराष्ट्राला ते आपल्या विदर्भीय अंदाजात खळखळून हसवतात. शूटींगवरुन घरी परतताना नुकताच रात्री त्यांना एका धक्कादायक अनुभवाला सामोरे जावं लागल्याचं त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितलं आहे.
कांदिवलीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर त्यांची गाडी ट्रॅफिकमध्ये असताना त्यांचा मोबाईल काही अज्ञातांच्या टोळीने लंपास केला असून अत्यंत विचित्र पद्धतीने त्यांनी ही चोरी केल्याचं भारत गणेशपुरे या व्हिडीओत सांगताना पाहायला मिळतायत. तसंच सर्व नागरिकांना त्यांनी हायवेवर सतर्क राहण्याची कळकळीची विनंतीसुध्दा केली आहे.
याप्रकरणी भारत गणेशपुरे यांनी पोलीस तक्रार केली असून पोलिसांनीही मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
पाहा व्हिडीओ, काय सांगतायत भारत गणेशपुरे