आमीर खान हे नाव पाणी फाउंडेशनशी जोडलं गेलं आहे. आमीर आणि पत्नी किरण रावने या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गावांचा दुष्काळ दुर लोटला आहे. 2 सप्टेंबर 2018 पासून हे फाउंडेशन पाणी आणि वृक्ष यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. पाणी फाउंडेशनने सातारा जिल्ह्यामध्ये गावक-यांच्या मदतीने 2000 झाडं लावली. त्यांची योग्य वाढ होण्यासाठी निगा राखली गेली.
या कामाचा एक व्हिडियो आमीरने शेअर केला आहे. या हिरवळीचं होणारं दर्शन मनाला सुखावून जातं. काही दिवसां पुर्वीचं जलशक्ती मंत्रालयाने पाणी फाउंडेशनला मान्यता देत त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळा संदर्भात या फाउंडेशनने भरीव कामगिरी केल्याचंही या मंत्रालयाने नमूद केलं आहे.