By  
on  

लतिकाच्या लग्नात येणार ट्वीस्ट, जुळणार लतिका आणि अभिची लग्न गाठ

सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना असते... सौंदर्याची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असते... याचविषयाला धरून कलर्स मराठीने एक आगळी वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली... आपण समाजात बघतो की, थोड्या स्थूल असणाऱ्या मुलीला 'नकार' देणारे तिच्या मनाचे सौंदर्य, तिच्यातील इतर गुणांची दखल घेत नाहीत. 

 

 

अशाच एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’… आपल्या मालिकेतील सुंदराला देखील अश्याच नकारांना सामोरी जावे लागले... पण बघता बघता तिला सज्जनरावांकडून लग्नासाठी होकार आला... लतीच्या घरामध्ये लगीनघाई सुरू झाली... या लग्नात अनेक विघ्न देखील आले...पण आलेली सगळी विघ्नं दूर करत शेवटी तो दिवस आला... पैशांच्या झालेल्या गडबडीमुळे सज्जन आणि त्याच्या घरच्यांनी लग्नाच्या दिवशी नकार दिला आणि लतिकाला मंडपात सोडून निघून गेले... मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे...

 हा सगळा झालेला प्रकार लतिकाच्या वडिलांसाठी सहन करणं अशक्य होऊन बसले आहे... त्यांची ही स्थिति बघता अभिमन्युचे वडिल एक निर्णय घेतात की लतिकाचे लग्न अभिमन्युशी होणार... जोडीदाराविषयी आपली काही स्वप्न असतात अगदी तशीच लतिकाची आणि अभिमन्यूची आहेत... पण, अभिमन्युची ही स्वप्न मात्र स्वप्नच रहाणार... कारण आता त्याला लतिकाशी लग्न करण्यावाचून कोणताही पर्याय नाही... 
कसा पार पडेल हा लग्नसोहळा ? अभि लतीशी लग्न करण्यास होकार का देईल ? लग्नानंतरचा लती आणि अभिचा प्रवास कसा असेल ? हे दोघे सुखी संसार करू शकतील ? तिच्या मनाचं सौंदर्य, फिटनेसचं अतोनात वेड असलेल्या बालमित्राने कधीच पाहिलं नाही पण तिच्या नवर्‍याला ते दिसेल का? हे समजण्यासाठी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका पाहायला हवी.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive