‘आई माझी काळुबाई' ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरतेय. ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची आहे . आर्याचा नुकतंच लग्न झालं आहे आणि ती सासरी नांदतेय. पण इथे तिला सुखाने जगता येत नाहीय. अनेक संकटं तिच्यासमोर आ वासून उभी आहेत.
आता आर्याला भाऊ संकेतला वाचविण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. भावाला सोडविण्यासाठी तिच्यासमोर एक मोठी अट ठेवली गेलीय. तिखट मिरच्यांनी भरलेलं ताट तिच्यासमोर देण्यात आलं आहे. त्या सर्व मिरच्या आर्याने खाल्यानंतरच तिचा भाऊ संकेतला सोडविण्याचं आश्वासन तिला मिळालं आहे. मागचा पुढचा कुठलाच विचार न करता आर्याने मिरच्या खायला सुरुवात केली आहे. तिला त्याचा खुप त्रास होतोय, पण फक्त संकेत सुटावा यासाठी ती ते करतेय.
काळूबाईवर निस्सीम भक्ती करणा-या आर्याला संकटातून सोडवण्यासाठी काळूबाई कशी येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.