By  
on  

जयदीपमुळे इतर सुनांप्रमाणे गौरीलाही मिळणार मान

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. जयदीप आणि गौरीमधील समंजस नातं आता हळू हळू आकारास येत आहे. जयदीपने गौरीचा पत्नी म्हणून स्विकार केला असला तरी घरच्यांनी मात्र म्हणावं तसं तिला स्विकारलं नाही. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

त्यामुळेच माईंनी लक्ष्मी पुजेवेळी इतर दोन्ही सुनांना सोन्याचं नाणं दिलं खरं पण गौरी पुढे आल्यावर तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यावर जयदीपने तिची बाजू उचलून धरत माईंना गौरीला सुनेचा सन्मान देण्याची मागणी केली. यावर शिर्के-पाटील कुटुंबियांची काय प्रतिक्रिया असेल हे मात्र मालिका पाहिल्यावरच समजेल.

Recommended

PeepingMoon Exclusive