By  
on  

पाहा Video : 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीचा अनिरुद्धला घर नावावर करु घेण्याचा सल्ला

'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती आता अनिरुद्धच्या सगळ्या गोष्टींना सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. त्यातच अनिरुद्धने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडून तो संजनासोबत राहायला गेलाय. तर दुसरीकडे अनिरुध्दच्या वडिलांनी घर अरुंधतीच्या नावावर केलय. 

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात अरुंधतीला पूजा करताना पाहून अनिरुद्धला आणखी चिड येते. यातच आता घर स्वत:च्या नावावर करून घेण्याचा सल्ला अरुंधती अनिरुद्धला देते. यासोबतच घरी जरी नावावर केलं तरी आपली माणसं कुठून आणणार हा सवालही विचारते. ती म्हणते की, "जिथे माझी माणसं असतात तेच माझं घर असतं."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

असं करून देखील अनिरुद्धला काही अद्दल घडत नाही. अनिरुद्ध त्याची चूक मान्य करायला तयार नाही. त्याचं सत्य सगळ्यांसमोर आल्यानंतर सगळी माणसं एक एक करून त्याच्यापासून दूर होत चालली आहेत. तेव्हा आता तरी अनिरुद्धला त्याची चूक लक्षात येईल का हे पुढील भागात समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive