By  
on  

पाहा Video : 'चंद्र आहे साक्षिला' मालिकेत स्वातीने रंगवलेल्या स्वप्नांना लागणार का कटकारस्थानांचं ग्रहण?

'चंद्र आहे साक्षिला' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून अभिनेत्री ऋतुजा बागवेने चार वर्षांनी टेलिव्हिजनवर पुनरागन केलय. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे आणि ऋतुजा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळतेय. या मालिकेत सुबोध श्रीधरची तर ऋतुजा स्वाती नावाची व्यक्तिरेखा साकारतेय.

नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेत सुरुवातीलाच विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. स्वाती आणि श्रीधर यांच्या बघण्याच्या कार्यक्रमानंतर आता स्वाती स्वप्न रंगवतेय. मात्र दुसरीकडे श्रीधर भविष्य बघतोय. सोहळ्यापेक्षा सोबतीचा आग्रह करणाऱ्या श्रीधरच्या प्रेमात पडलेली स्वाती आता रात्र जागवून स्वप्ने बघतेय. मात्र श्रीधरचं वेगळच कारस्थान समोर येतय. 

 

स्वातीने श्रीधरसोबत रंगवलेल्या स्वप्नांना लागणार श्रीधरच्या कटकारस्थानांचं ग्रहण लागणार का ? काय असेल यातला नवा ट्विस्ट हे मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईलच. मात्र या मालिकेतील रहस्य प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय एवढं नक्की. 

'तुला पाहते रे' या मालिकेतही अभिनेता सुबोध भावेच्या भूमिकेतील ट्विस्टने मालिका रंजक बनवली होती. याशिवाय 'भयभीत' या सिनेमातील सुबोधच्या व्यक्तिरेखेतला ट्विस्ट चकित करणारा होता. 'चंद्र आहे साक्षिला' या मालिकेतीह सुबोधच्या व्यक्तिरेखेतली अभिनयाचा वेगळा पैलू पाहायला मिळतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive