By  
on  

प्रेक्षकांची लाडकी मालिका येतीये परत, जाणून घ्या कोणती आहे ही मालिका?

 गाजलेल्या मराठी मालिकांचं नाव घेतल्यावर ‘अग्निहोत्र’ या मालिकेचा उल्लेख स्वाभाविक आहे. त्यावेळी मालिकाविश्वात या मालिकेने आघाडीचं स्थान मिळवलं होतं. एक चिरेबंदी वाडा, काहीसे औपचारिक नातेसंबंध आणि आठ गणपती यांच्याभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना भलतीच आवडली होती. काहीसं गुढ वलय असलेल्या या मालिकेचं कथानक आणि कलाकारांचा अभिनय या सगळ्यांनीच प्रेक्षकांवर गारुड केलं होतं.

या मालिकेच्या फॅन्ससाठी आता आनंदाची बातमी आहे. या मालिकेचा सीझन 2 येण्याची शक्यता आहे. हा सीझनही पहिल्या सीझनप्रमाणे गुढ असल्याचं बोललं जात आहे. मागील भागांप्रमाणेच दुस-या भागाच्या दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडे आणि लेखनाची श्रीरंग गोडबोले यांच्यावर आहे. या वर्षाखेरीस ही मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive