By  
on  

संभाजी महाराज लेकीचं लग्न पार पडणार की स्वराज्यावरचं विघ्न दूर करणार?

झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. औरंगजेबाचा निः पात करण्यासाठी संभाजी महाराज आपल्या साथीदारांची आणि मावळ्यांची जमवाजमव करणार आहेत. पण यातच संभाजी महाराजांच्या मुलीचं सुद्धा लग्न आहे. त्यामुळे संभाजी महाराजांसमोर एक पेच उभा राहिला आहे. 

मुलीचं लग्न आणि औरंगजेबाच्या वध करण्याचा दिवस एकाच दिवशी आल्याने संभाजी महाराजांसमोर आगळाच पेच उभा राहिला आहे. तसेच या सर्व गोष्टींची येसुराणीसाहेबांना कल्पना आहे. त्यामुळे त्या संभाजी महाराजांना मोहीम पुढे ढकलण्याची गळ घालतात. त्यामुळे आता संभाजी महाराज कोणता निर्णय घेणार आणि ते मुलीचं लग्न आणि औरंगजेबाचा पाडाव दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा साधणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

 

 

'स्वराज्यरक्षक संभाजी' ही ऐतिहासिक मालिकेने दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अढळ इथं निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. डॉ.अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या संभाजी महाराजांवर प्रेक्षकांनी अमाप प्रेम केले आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive