बिग बॉसच्या घरातील अभिजीत बिचुकले यांच्यासमोर आणखी एक नवी अडचण उभी राहिली आहे. न्यायालयाने बिचुकलेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात परतण्याचा बिचुकलेंचा मार्ग आणखी बिकट झाला आहे. सातारा पोलिसांनी बिचुकलेंना चे२ बाऊन्स प्रकरणात अटक केली आहे. आतापर्यंत तक्रारदाराने बिचुकले विरोधातील फिर्याद मागे घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं त्यामुळे बिचुकलेंना काही अंशी का होईना दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
चेक बाऊन्स शिवाय २०१२ मध्ये बिचुकले याने फिरोज पठाण यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणीची मागणी केली असाही बिचुकलेंवर आरोप दाखल झाला आहे. त्यामुळे बिचुकले यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मागील शनिवारी महेश मांजरेकरांनीही बिचुकलेंच्या नावाचा अनेकदा उल्लेख केला. त्यामुळे बिचुकलेंवर कार्यक्रमाचा टीआरपी ब-याच अंशी अवलंबून असल्याचं दिसत आहे. एरवी प्रत्येकाच्यामध्ये बोलणारे, स्वत:ची अशी स्ट्रॅटजी मांडणारे बिचुकले शोमध्ये नसल्याने प्रेक्षक सातारी तडका मिस करत आहे. एकीकडे बिग बॉसची टीमही बिचुकलेंच्या सुटकेसाठी साता-यात ठाण मांडून बसली असल्याचं समजलं आहे. त्यामुळे आता ते बिग बॉसच्या घरी लवकरच परततील अशी त्यांच्या फॅन्सना आशा आहे.