बिग बॉसच्या घरात कधी काय होईल याचा नेम नाही. एकमेकांच्या गळ्यात गळा घालणारे सदस्य कधी गळे धरतील हे देखील सांगता येत नाही. माधव गेल्यापासून शिवानी आणि नेहा यांनी भांडायचं नाही असं ठरवलं होतं. पण या मुद्द्यावर दोघीही कायम राहताना दिसत नाहीत. अलीकडेच या दोघीही एकमेकींशी भांडताना दिसून आल्या.
शिवानी म्हणते, ‘जसा तिला राग येतो तसा दुसर्याना देखील राग येतो. तिला एका विशिष्ट पध्दतीने कोणी बोललं की त्रास होतो. तू सगळ्यांसमोर मला असे नाही बोलू शकत नेहा. हे शिवानीने नेहाला सुनावलं आहे. किशोरीताईंनी या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावर नेहा म्हणते की ती कितीही वेळा शिवानीशी स्वत:हून बोलायला जाऊ शकते. यावर शिवानी म्हणते की ‘त्याची काही गरज नाहीये. तू माधवबाबतही असंच केलंस. दरवेळी तू चांगली ठरत गेलीस. त्यामुळेच माधव बाहेर गेला.’ आता शिवानीच्या आरोपानंतर नेहा तिच्याशी मैत्री कितपत कंटिन्यु करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.