By  
on  

अभिनेता जितेंद्र जोशी म्हणतो,’खड्डे आणि बरंच काही’

आज मुंबईत सकाळपासुन मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाचा फटका रस्त्यावरील वाहतुकीवर सुद्धा झालेला पाहायला मिळत आहे. जागोजागी पाणी साचल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

याच ट्रॅफीकचा फटका अभिनेता जितेंद्र जोशीला सुद्धा झालेला पाहायला मिळाला. जितुने नुकतीच त्याच्या सोशल मिडीयावर एक मिश्किल पोस्ट टाकली आहे. 'Jvlr ते पवई 5 किमी यायला 3 तास. तीन वेळेचं जेवण घेऊन निघा. #खड्डे आणि बरंच काही' अशी पोस्ट जितुने शेयर केली आहे. 

यावरुनच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणि ट्रॅफीकमुळे कलाकारांना तसेच सामान्य नागरीकांना आज किती मनस्ताप सहन करावा लागत असेल, याचा अंदाज येत असावा. हवामान खात्याने या पुढेही तीन दिवस 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive