स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपुर्ण महाराष्ट्रात आवडीने पाहिली जाते. मराठी जनांचं दैवत असलेल्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा जीवनकाल या मालिकेतून दाखवला आहे. संभाजी महाराजांविरुद्ध गडांवर अनेक कटकारस्थानं शिजली. आता या कारस्थानाचा रोख महाराजांचा प्राणप्रिय सखा कवी कलश यांच्याकडे आला आहे. अनाजी पंतांनी सदरेवर कवी कलशांवर राजद्रोहाचा आरोप केला आहे.
https://twitter.com/ZEE5Marathi/status/1134402524025278465
अनाजीपंतांनी सदरेवर कवी कलशांचा निवाडा करायचा आहे म्हटल्यावर सगळेच अवाक होतात. पण अनाजीपंतांकडे पुरावे असल्याने राजांचा नाईलाज होतो. त्यामुळे ते कवी कलशांना सदरेवर हजर राहण्याचा आदेश देतात. कवी कलशांवर नक्की कसला आरोप आहे आणि त्याबद्दल काय पुरावे पंतांकडे आहेत हे लवकरच कळेल. पण महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून आरोपी सुटणार नाही हे मात्र नक्की!