बिग बॉसच्या घरामध्ये वाद नाही झाला असं होणं अशक्यच. जसे जसे दिवस वाढत जातील तसे तसे वाद वाढणार. कारण प्रत्येकाच्या सवयी, स्वभाव हा खटकणार. मागच्या सिजनप्रमाणे याही सीजनमध्ये स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसत आहेत.
मागचा संपूर्ण आठवडा आपल्या सगळ्यांचे आवडते विद्याधर जोशी म्हणजे बाप्पा अत्यंत शांतपणे,समंजसपणे सगळ्यांना सांभाळून घरात वावरताना दिसले. पण आज मात्र विणा आणि विद्याधर जोशींमध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे. ज्यामध्ये बाप्पा जोशी “मी ईथे कुणालाही सुधारायला आलो नाही” असे वीणाला सांगितले.
या भांडणामध्ये किशोरी शहाणे आणि पराग हे दोघेही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या वादा दरम्यान अजून एक मुद्दा वीणा अधोरेखित करताना दिसणार आहे आणि तो म्हणजे जेव्हा तिकडच्या मुली शिव्या देतात तेव्हा बाप्पा म्हणतात “आपल्या मुलीने शिवी दिली, ठीक आहे” आणि आम्ही काही बोलो तर पक्षपातीपणा होतो हे बरोबर नाही.
इतक्यावरच हे संपले नाही तर वीणाने विद्याधर यांना ''तू काड्या करतोस, आग लावतो'' असे देखील सुनावले. वीणाला विद्याधर जोशी यांनी बिनडोक असे म्हंटले आणि ज्यामुळे ती खूप चिडली. त्यामुळे दोघांचेही एकमेकांवरचे हे आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले
आता या वादाचे पुढे काय होणार ? कोण नमतं घेणार ? हे प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळून येईल.