'बिग बॉस मराठी 2' च्या घरात सध्या गटबाजीचं राजकारण जोरात सुरु आहे. सध्या असलेल्या १५ स्पर्धकांमध्ये आपापसात ग्रुप पडल्यामुळे बिग बॉसच्या घरात वेगळी चूल मांडण्यात येणार का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पराग कान्हेरे आणि नेहा शितोळे यांच्यामध्ये सतत जेवणावरून भांडणं होत असलेली दिसून येत आहेत. त्यामुळे परागने आता मी आमच्या चौघांचं जेवण वेगळं बनवतो असं सांगितलं आहे. आता हि चौघं म्हणजे पराग, रुपाली,वीणा आणि किशोरीताई असल्याची शक्यता आहे.