बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या पाणी या मराठी सिनेमाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 66 वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळेच प्रियांका चोप्राला आपल्या निर्मिती संस्थेचा आणि संपूर्ण टीमचा खुप अभिमान आहे. म्हणूनच प्रियांकाने सर्वांचे आभार मानणारी एक पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन केली आहे.
अभिनेता आदिनाथ कोठारेने प्रियांका चोप्रा निर्मित पाणी या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. तसंच दिग्दर्शनासोबतच ह्या सिनेमात प्रमुख भूमिकासुध्दा साकारली आहे. दिग्दर्शन करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. पण त्याच्या या पहिल्याच चित्रपटाला चांगलेच यश मिळाले आहे. पाणी या अतिशय महत्त्वाप्च्यारियांक विषयावर ह्या सिनेमात भाष्य करण्यात आले आहे.
प्रियांका चोप्रा आपल्या इंस्टाग्रामवर म्हणते, " मला खुप अभिमान वाटतो की, 'पाणी' सारख्या एका खास सिनेमाची निर्मिती केली. माझ्या पर्पल पेबल पिक्चर्सच्या संपूर्ण टीमचे मनापासून आपल्या दुस-या नॅशनल अवॉर्डसाठी खुप धन्यवाद मानते आणि सर्वात मोठं अभिनंदन आदिनाथ कोठारे आणि त्याच्या संपूर्ण क्रिएटिव्ह टीमसाठी, ज्याने हा सिनेमा साकारण्याचं आव्हान पेललं.
Wow that is so kind of you @priyankachopra ! Means a lot ! Thank you for believing in us and our dream ! Couldn’t have been possible without your support and guidance ! Now excited and looking forward to our next announcement with #Paani ! https://t.co/RylPv1tHtd
— Adinath Kothare (@adinathkothare) August 9, 2019