सांगली, कोल्हापुरमधील पुरपरिस्थितीने सगळा महाराष्ट्र हेलावला. पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अनेकजण मदतीला धावून आले आहेत. मराठी कलाकारांनीही रसिकांना आवाहन केलं आणि स्वत:ही मदतीला धावून आले. यावेळी बॉलिवूड कलाकारांकडून काहिही मदत होत नसल्याचा आरोप अनेकांकडून केला गेला होता. पण आता बॉलिवूड कलाकारही मदतीसाठी पुढे येत आहेत.
We are also thankful to Respected Lata Didi for the contribution of ₹11,00,000/- (₹11 lakh) towards #CMReliefFund #MaharashtraFloods !
आदरणीय लतादीदी मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचे योगदान प्राप्त झाले, मी त्यांचा अतिशय आभारी आहे!@mangeshkarlata— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 20, 2019
काही दिवसांपुर्वी अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, अक्षय कुमार हे कलाकार मदतीला पुढे आले. त्यानंतर आमीर खान आणि लता मंगेशकर हे देखील मदतीसाठी पुढे आले आहे. लतादीदींनी 11 लाख रुपये मुख्यमंत्री पुरग्रस्त निधीसाठी दिले आहेत. तर आमीरने 25 लाख रुपये ही रक्कम या फंडात जमा झाली आहे.
Thank you @aamir_khan for your contribution of ₹25,00,000/- (₹25 lakh) towards #CMReliefFund #MaharashtraFloods !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 20, 2019
.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीसांनी लतादीदी आणि आमीर खान याचेही आभार मानले आहेत. ‘आदरणीय लतादीदी मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचे योगदान प्राप्त झाले, मी त्यांचा अतिशय आभारी आहे!’ या शब्दात मुख्यमंत्र्यांनी लतदीदींचे आभार मानले आहेत.