पहिल्या दिवशी कोल्हापूरची अंबाबाई, दुसऱ्या दिवशी कामाख्या, तिसऱ्या दिवशी जरीमरी आई, चौथ्या दिवशी महालक्ष्मी अशा रुपांमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने पाचव्या दिवशी 'शेरावाली माते'चं रूप धारण केलं आहे. ती आपल्या प्रत्येक रुपासह एक संदेश देते.
तेजस्विनीने आपल्या रुपासह संदेश देत एक ज्वलंत सवाल केला, " वाजत गाजत आणलस खरं मला..बसवणार कुठे? कुठे आहे माझं वाहन? कशावर आरूढ होणार मी? तुझ्या अस्त्वित्वाचा पसारा वाढवताना तू माझ्या दुसऱ्या लेकाचा आसरा नष्ट केलास. त्याच्या कातडी साठी त्याच्या नखांसाठी त्याचा जीव घेतलास? अरे वेड्या तू त्याचे अस्तित्व संपवत नाहीयेस फक्त ...तुझेही संपवतोयस. अन्न साखळी विसरलास? ‘परस्पर-पूरकता’ विसरलास? समतोल ढासळलाय......माझ्या डोळ्यांदेखत मी उभारलेली सृष्टी मला विनाश होताना दिसतेय....मी हतबल आहे...माझ्या हाती शस्त्र आहेत पण त्यांचा वापर करून तुमची हि वृत्ती मी कशी घालवणार? "