अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने आजच्या धकाधकीच्या आयुष्यातील मायानगरी मुंबईतील सर्वात ज्वलंत समस्या ट्रॅफीकवर आपल्या आजच्या सप्तमीच्या रुपातून प्रकाशझोत टाकला आहे. प्रगगतीच्या मार्गाने पुढे जाणाऱ्या माणसाला निसर्गाचा मात्र विसर पडला आहे. रस्त्यांवर फक्त आणि फक्त ट्राफिक ही कसली प्रगती? असा प्रश्न तेजस्विनीने लोकांना केला आहे.
आपल्या आजच्या ह्या मुंबादेवी रुपातून तेजस्विनी आपल्याला विचार करायला भाग पाडतेय. ती म्हणते, "देशाची आर्थिक राजधानी असा माझा लौकिक ....देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येकाला मी माझ्यात सामावून घेतले.....प्रत्येकाच्या प्रगतीसाठी हृदयाप्रमाणे अखंडित धड्कत राहणारी मी !!! जीवनाचा -प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या रस्त्याचं जाळ तू इथे विणलं नसतंच तरच नवल होतं........पण त्यावरील अगणित खड्डे? ..ते मात्र जीवघेणे ठरतायेत....सगळीकडे फक्त ट्राफिक आणि ट्राफिक....हि कसली प्रगती? हरवलेय मी या कोलाहलात ....मला भक्तांची आर्जवे ऐकू येत नाहीत की समुद्राची गाज ....अहोरात्र ऐकू येतो तो कर्णकर्कश्श होर्न आणि गोंगाट...
हि माझी नगरी .....मी मुंबा आणि हि माझी मुंबा पुरी ..मुंबई!!!"