26 नोव्हेंबर 2008 ची मुंबईमधील काळरात्र अजुनही कोणी विसरलं नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यामध्ये असंख्य निरपराध माणसांचे प्राण गेले. तसेच या क्रुर आतंकवाद्यांशी सामना करणा-या पोलीसांना सुद्धा स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
या काळरात्री शहीद झालेल्या शुरवीरांना मराठी सेलिब्रिटींनी भावपुर्ण आदरांजली वाहीली आहे. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांनी ट्विटरवर हृद्य शब्दांमध्ये आदरांजली वाहीली. पिपिंगमून मराठीतर्फे शहीद जवानांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
अनेक आठवणींचा काळा दिवस म्हणजे २६/११....
कै. तुकाराम ओंबळे स्मृती दिवस..
स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या अशा या निडर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
— Siddharth Jadhav (@SIDDHARTH23OCT) November 26, 2019
२६/११/२००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या शुरवीरांना
भावपूर्ण श्रद्धांजली #MumbaiTerrorAttack #2611attack #RememberingTheHeroes— Sonalee (@meSonalee) November 26, 2019
२६/११ ला सामान्य नागरिकांचे प्राण वाचवताना शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण आदरांजली
सलाम— सुबोध भावे (@subodhbhave) November 26, 2019
#JaiHind #SalutetoService https://t.co/8GM3bzuij0
— स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) November 26, 2019