महाभारत या महाकाव्याने आजवर अनेक कलाकारांवर गारुड केलं आहे. या काव्याला कलेच्या परिघात बनण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. आता मराठी सिनेमातही असा प्रयोग होताना दिसणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार दिग्दर्शक संजय जाधव आता महाभारतावर बेतलेला सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहेत. .
महाराभारतासारख्या महाकाव्यावर आधारलेला सिनेमा असाच भव्यदिव्य असेल यात शंका नाही. या सिनेमाबाबत माहिती समजताच त्यात कलाकार कोण असेल याबाबत चर्चा सूरु झाली आहे. स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर या लाडक्या कलाकारांना महाभारताच्या निमित्ताने वेगळ्या रुपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळू शकते.
संजय यांनी अलीकडेच ‘खारी बिस्कीट’ या सिनेमाची निर्मिती केली होती. अंध बहीण आणि तिचा भाऊ यांच्या बाँडिंगवर हा सिनेमा आधारित होता.