By  
on  

सुबोध भावे म्हणतो, ‘अगदी तेव्हाच आशेचा किरण आपल्या आयुष्यात येतो’

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती करोनाची. महाराष्ट्रात वेगाने हात-पाय पसरत असलेल्या करोनाच्या दहशतीने सगळेच धास्तावले आहेत. करोनाबाबत जागरुकतेचा प्रसार सर्वत्र होत असताना सेलिब्रिटीही या कामी पुढे येत आहेत. अभिनेता सुबोध भावेने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. 
सुबोध या पोस्टमध्ये म्हणतो, ‘खूप घाबरायला होतं, अस्वस्थ होतं, आजूबाजूची परिस्थिती भीती च वातावरण निर्माण करते.... अगदी तेव्हाच आशेचा एक किरण ही आपल्या आयुष्यात येतो. घाबरू नका,भिऊ नका,स्वच्छ रहा,सुरक्षित रहा. स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या’.

 

 

सुबोध अलीकडेच विजेता सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण करोनामुळे सिनेमागृह बंद असल्याने विजेता पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी विजेतामधील आणखी एक कलाकार सुशांत शेलारनेही चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive