By  
on  

करोनाच्या पार्श्वभूमीवर लतादीदी म्हणतात, ‘जबाबदारीने वागूया’

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती करोनाची. करोनावरील चर्चांनी प्रत्येकाचं आयुष्य व्यापला आहे. प्रत्येक माध्यमातून करोनाची भिती अनेकांना जाणवत आहे. भारतरत्न लतादीदींनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. लतादीदींनी ट्वीट करून याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात, ‘ आपण जबाबदार नागरिक आहोत, त्यामुळे स्वच्छता आणि काळजी घेणं गरजेचं आहे. सर्दी आणि खोकला असलेल्यांनी शक्यतो सामाजिक अंतर ठेवून वागणं इष्ट आहे.

 

 

या सगळ्या सुचना आरोग्य संघटनांनी दिल्या आहेत. काळजी घ्या.’ सध्या मुंबई, पुणे, नागपुर, यवतमाळ या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोना व्हायरसचे पेशंट दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटीही चाहत्यांना सतर्क राहण्याचं, काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive