पावसाळा हा सर्वांचा आवडता आणि ऋतू. या धुंद-बेधूंद ऋतूची वर्षभर वाट पाहिली जाते. सगळीकडे आल्हदायी वातावरणाची नांदी असते. सर्वत्र हिरवळ हवाहवासा गारवा. सोबत चहा आणि भजी. प्रत्येकाची पावसासोबतची समीकरणं ही वेगवेगळी असतात. कोणाला पाऊस म्हटलं की कविता सुचतात तर कोणाला नुसतंच गावंसं वाटतं.
अभिनेत्री अमृता सुभाषचंसुध्दा असंच काहीसं झालं आहे. ती सूर्यप्रकाशात मस्त बेधुंद गाण्यात हरवून गेली आहे. अमृता म्हणते, "सूर्यप्रकाशात गायलेलं पावसाचं गाणं.. आला पाऊस आला.."
अमृताच्या या गाण्यावर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.