केंद्र सरकारनं नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिल्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक स्तरांतून या निर्णयाचं स्वागत करतानाच सरकारची कानउघडणीसुध्दा करण्यात येत आहे.
प्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही या नव्या धोरणाविषयी ट्विट करून आपलं मत मांडलं आहे. “दहावी बारावीचा “तेरावा” घातला… शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा अभ्यास झालेलाच असतो,” असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.
दहावी बारावीचा “तेरावा” घातला... शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा आभ्यास झालेलाच असतो. #educationpolicy
— Kedar Shinde (@mekedarshinde) July 29, 2020