सध्या एकच चर्चा सर्वत्र रंगलीय ती म्हणजे सरकारने घेतलेल्या नाईट लाईफच्या निर्णयाची. आता मुंबईत नाईट लाईफ 27 जानेवारीपासून सुरु झालीय. सरकारच्या निर्णय बरोबर असल्याने काही सहमत आहेत तर हा निर्णय साफ चुकीचा असल्याचं काहींचं म्हणणं आहे. पण तुम्हाला माहितीय का आपल्या आर्चीला नाईट लाईफ म्हणजे काय हेच माहिती नाहीय.
पुण्यातील एका पत्रकार परिषदेत अभिनेत्री रिंकू राजगुरुला मुंबईच्या नाईट लाईफबद्दल प्रश्न केला. पण तिने आपल्याला नाईट लाईफबदद्ल काहीच माहित नसल्याचं सांगितलं. त्यामुळे तिचं हे उत्तर ऐकून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला. नाइट लाइफ म्हणजे काय हे मला माहित नाही, त्यामुळे त्यावर मी मत व्यक्त करू शकत नाही, असं यावेळी रिंकूने स्पष्ट केलं.
‘सैराट’ या पहिल्याच चित्रपटातून रिंकू राजगुरू हे नाव रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतंय. आर्चीला रसिकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर ती 'कागर'मधून रसिकांच्या भेटीला आली आणि आता तिचा बहुचर्चित मेकअप हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येतोय.