केरळमध्ये अलीकडेच घडलेल्या घटनेने प्रत्येकाचंच मन सुन्न झालं आहे. केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला फटाक्याने भरलेला अननस खायला दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील स्थानिकांनीच हे कृत्य केल्याचं समजत आहे.पण या घटनेवर देशभरातून तसंच सेलिब्रिटींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अभिनेता सुबोध भावेनेसुध्दा आपला संताप या कृत्याचं वृत्त समजताच व्यक्त केला. 'माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय' असं ट्विट करत एखाद्या माणसाच्या हत्येनंतर जशी शिक्षा मिळलते तशीच या घटनेतील आरोपींना देण्यात यावी अशी मागणीसुध्दा सुबोधने यावेळी केली.
ज्या प्राण्यावर आपण उदंड प्रेम करतो,त्याला आणि त्याच्या येऊ घातलेल्या जीवाला ज्या क्रूर पद्धतीने वागवण्यात आलं ते पाहून माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय.
जी शिक्षा एखाद्या माणसाच्या बाबतीत दिली गेली असती त्याचप्रमाणे आत्ताही दिली गेली पाहिजे.#hathimeresathi— Subodh Bhave (@subodhbhave) June 3, 2020
“ज्या प्राण्यावर आपण उदंड प्रेम करतो, त्याला आणि त्याच्या येऊ घातलेल्या जीवाला ज्या क्रूर पद्धतीने वागवण्यात आलं ते पाहून माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय. जी शिक्षा एखाद्या माणसाच्या बाबतीत दिली गेली असती त्याचप्रमाणे आत्ताही दिली गेली पाहिजे”. असं ट्विट सुबोधने केलं आहे.
असंही फटाके मला आवडत नाहीत.
पण या नंतर जेव्हा जेव्हा फटाके फुटतील तेव्हा तेव्हा त्या दोन निष्पाप जीवांचा चेहरा डोळ्यासमोर येईल.
आणि त्या फटाक्यांमधून समोर येईल ती फक्त माणसाची क्रूरता.#hatimeresathi— Subodh Bhave (@subodhbhave) June 3, 2020
तसंच या घटनेवर एका चाहत्याने अस्वस्थ करणारी कविता प्रतिक्रिये दाखल दिल्याने सुबोधने तिसुध्दा शेअर केली आहे.
फारच अस्वस्थ करणारी कविता.... https://t.co/rMKT7oMAnd
— Subodh Bhave (@subodhbhave) June 3, 2020