आज नीतू आणि ऋषी कपूर यांच्या लग्नाचा 41 वा वाढदिवस आहे. दुर्दैवाने लग्नाच्या 40 वर्षांनंतर ऋषी यांनी इहलोकाचा प्रवास संपवला. या दिवसाचं औचित्य साधत नीतू यांनी एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये अनेक नीतू आणि ऋषी ‘मोमेंट’ आहेत.
या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये नीतू म्हणतात, ‘ आज 41 वर्षं झाली असती....’ यावरून नीतू ऋषी यांना किती मिस करत असतील याचा अंदाज लावता येणं शक्य आहे. फॅन्स या सुपरहिट जोडीला अनेक शुभेच्छा देत आहेत. ऋषी यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला. लॉकडाऊन असल्याने अनेकांनी त्यांना सोशल मिडियावरूनच श्रद्धांजली वाहिली.