अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर हॉर्न ओके प्लिज या 2008 साली घडलेल्या तथाकथित प्रकरणानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने गैरवर्तवणुकीचे आरोप आत्ता केले आहेत. त्यामुळे हा फारच मोठा वाद बॉलिवूडमध्ये पेटला आहे. याप्रकरणी दोन गट पडले असून काही सेलिब्रिटी तनुश्रीच्या बाजूने आहेत, तर काही नानांच्या बाजूने त्यामुळे हे प्रकरण आता दिवसेंदिवस चिघळतच चाललं आहे.
महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण वाद सुरु झाल्यापासून नानांची कुठलीच प्रतिक्रिया मिळाली नव्हती. ते शूटींगसाठी जोधरपूरमध्ये होते. आज नुकतेच ते मुंबई विमानतळावर पोहचले. याप्रकरणी त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सर्वचजण खुप उत्सुक होते. नाना विमानतळावर पोहचताच पत्रकारांनी त्यांना एकच गराडा घातला. पण नानांनी संपूर्ण गर्दी आणि गोंधळात एकच वक्तव्य केलं. ते म्हणाले, ‘मी याआधीही उत्तर दिलं आहे. जे खोटं आहे ते खोटंच आहे,’ असं नाना म्हणाले.
https://twitter.com/ANI/status/1048522694382313472
अमेरिकेहून परतलेल्या तनुश्री दत्ताने आत्ता 10 वर्षांतर हे प्रकरण उकरुन काढल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडसह चाहतेसुध्दा प्रचंड हादरले आहेत आणि त्यात सर्वच स्तरातून याप्रकरणी संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. राजकीय पक्षांनीसुध्दा आता या वादात नानांच्या बाजूंनी ठामपणे उभी राहण्याची कणखर भूमिका घेतलीय.
काहीचं मत आहे की, सिनसृष्टीत असे प्रकार जाणीवपूर्वक दाबून टाकले जातात. याविरुध्द आवाज उठवणं गरजेचं आहे. तर काही म्हणतात याप्रकरणी तनुश्रीने सबळ पुरावे सादर करावेत, त्यानंतरच निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
आता नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता वादाला कोणतं नवीन वळण प्राप्त होतंय हे येणारा काळच ठरवेल.