By  
on  

संजय लीला भन्साळी आणणार ‘करण-अर्जुन’ला एकत्र, चाहत्यांना उत्सुकता

बॉलिवूडमध्ये अनेक आंबट गोड कोपरखळ्यांचा समावेश असलेल्या मैत्रींपैकी एक म्हणजे सलमान-शाहरुखची मैत्री. या जोडीला एकत्र पाहणं चाहत्यांसाठीही आनंददायी अनुभव असतो. त्यामुळे आगामी सिनेमात एकत्र कधी दिसणार याची उत्सुकता या दोघांनाही असते.

ही जोडी २००२ मध्ये ‘हम तुम्हारे है सनम’ मध्ये एकत्र झळकली होती. त्यानंतर एका सिनेमात एकत्र येणं टाळलं आहे. अनेक दिग्दर्शक करण-अर्जुनच्या जोडीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे संजय लीला भन्साळी. जवळपास १९ वर्षांनंतर सलमान संजय यांच्यासोबत काम करणार आहे. त्यांची या सिनेमात शाहरुखलाही आणण्याची इच्छा आहे. सगळं नीट राहिलं तर प्रेक्षकांना या जोडीला एकत्र पाहण्याची संधी मिळेल. संजय लीला भन्साळींचा हा सिनेमा एक प्रेमकथा असणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive