By  
on  

अनुष्का शर्मा आणि तिचा वास्तूतज्ज्ञ यांचा हस्तक्षेप टीम इंडियाला भोवला?

 क्रिकेटर्ससोबत त्यांच्या पत्नीदेखील अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात असतात. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासोबत हे जरा जास्तच घडतं. पण विराटच्या टीममेट्समध्ये अनुष्का फारशी लोकप्रिय नाही. याचं कारण आहे अनुष्काचा टीम व्यवस्थापनातील हस्तक्षेप. परदेश दौ-यात टीम इंडिया कोणत्या हॉटेलमध्ये थांबेल हे अनुष्का शर्मा आणि तिचा वास्तूतज्ज्ञ ठरवत असतो.

वास्तूशास्त्रानुसार टीमसाठी हॉटेल निवडण्याचे अधिकार सौभाग्यवती कोहलींकडे असतात. खरं पाहता खेळाडूंची तिकीटं ते हॉटेल निवडण्याची जबाबदारी बीसीसीआयची असते. पण सध्या परिस्थिती उलट आहे. खरं पाहता हा अंधविश्वासदेखील असू शकतो. अनुष्काने विराटचा ड्रेसिंग सेन्स बदलला आहे हे खरं असलं तरी टीमचे निर्णय घेण्याचा अधिकार मात्र तिला दिलेला नाही. आता यावर बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive