अक्षय कुमारची सोशल मिडियावरील पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये अक्षयने त्याच्या गतकाळातील एक फोटो शेअर केला आहे. याफोटोच्या माध्यमातून त्याने भारतातील एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षयने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो घरातील एका सायकलवर बसला आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘ वाढत्या वयासोबत माझी ओढ कायमच खेळाकडे होती. त्यामुळे मला चौरस आणि परिपूर्ण आहार मिळेल याकडे माझ्या आईचा कल असायचा. पण दुर्दैवाने भारतात रस्त्यावर जीवन कंठत असलेल्या मुलांच्याबाबतीत हे घडतंच असं नाही. भारतातील 11,72,604 लहान मुलांना साधं एक वेळेचं जेवणही मिळत नाही. आता वेळ आली आहे, की या भेदभावाविरोधात आवाज उठवला जावा.’ अक्षय सामजिक प्रश्नांवर काम करण्यामध्ये कायमच अग्रेसर राहिला आहे.