By  
on  

श्वेता तिवारी म्हणते, 'माझं दुसरं लग्न म्हणजे विषयप्रयोग'

टीव्ही जगतातील प्रसिध्द अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या दुस-या वैवाहीक जीवनातसुध्दा अपयशी ठरली. अभिनव कोहलीसोबत तिने केलेलं दुसरं लग्नसुध्दा हल्ली मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरतोय. नुकतंच श्वेताने आपल्या दुस-या लगग्नाबाबत एका मुलाखतीत मौन सोडलं. 

श्वेताला तिच्या ह्या कठीण प्रसंगाविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा श्वेता म्हणते, मला नेहमी सर्वजण विचारतात, या निर्णयावर तु खुश आहेस, तर माझं उत्तर आहे, हो मी खुप खुश आहे. आधी मी अनेक त्रासातून-जाचातून जात होते पण आता मी एक आनंदी व मुक्त जीवन जगतेय. ‘कोहलीशी झालेले लग्न हे माझ्या शरीराला एक प्रकारचा झालेला विषारी संसर्ग होता आणि आता तो मी संसर्ग शरीरातून काढून टाकला आहे. लोकांना असं वाटते की तो माझ्या शरीराचा भाग आहे पण मला तो विषारी असल्यामुळे शरीरातून बाहेर काढून टाकावा लागला. आता मी निरोगी आहे.  मी आनंदी असण्याचा आव अजिबातच आणत नाहीय. मी सध्या माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे’ असे श्वेता म्हणाली. 

‘माझे दुसरे लग्न कसे मोडू शकते? असा प्रश्न उभा करणाऱ्यांना मी प्रश्न विचारेल, का नाही मोडू शकत? संसारात चुकीच्या गोष्टी घडूच शकत नाही का? कमीतकमी माझ्यात या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याचे आणि सर्वांसमोर मांडण्याची हिंमत माझ्यात आहे.  

पहिला पती राजा चौधरीसोबत विभक्त झाल्यानंतर अभिनव कोहलीसह श्वेताने 2013 साली दुसरा विवाह केला. अभिनवपासून श्वेताला एक 2 वर्षांचा मुलगा आहे. तर पहिल्या पतीपासून श्वेताला एक 15 वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव पलक असून ती एक होतकरु अभिनेत्री आहे. 

श्वेता लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती ‘मेरे डॅड कि दुल्हन’ या मालिकेत झळकणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive