हैद्राबाद येथील डॉक्टर प्रियांका रेड्डी हिच्यावर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आलं. या घटनेचा देशभरातून निषेध होताना दिसत आहे. या प्रकरणी देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेणारा अभिनेता अक्षय कुमारनेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. अक्षयने सोशल मिडियावर पोस्ट करून या घटनेतील आरोपींना फाशी द्यावी असाही आरोप केला आहे.
Whether it is #PriyankaReddy in Hyderabad, #Roja in Tamil Nadu or the law student gangraped in Ranchi,we seem to be losing it as a society. It has been 7 yrs to the gut-wrenching #Nirbhaya case & our moral fabric continues to be in pieces.We need stricter laws.This needs to STOP!
— Akshay Kumar (@akshaykumar) November 29, 2019
अक्षय त्याच्या ट्वीटमध्ये म्हणतो, ‘जिथे प्रियांका रेड्डीवर हैद्राबादमध्ये, रोजावर तामिळनाडूमध्ये, रांची येथील एका लॉ स्टुडंट्वर सामुहिक बलात्कार करण्यात आला. हे पाहून वाटतं आपण समाजभान विसरत चाललो आहोत. मन विदीर्ण करणा-या निर्भया प्रकरणाला सात वर्षं झाली.
आपण केवळ पोकळ नैतिकतेवर बोलत आहोत. आपल्या अजून कडक कायद्याची गरज आहे. हे थांबायला हवं. या प्रकरणावर अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि किर्ती सुरेश यांनीही या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.
#RIPPriyankaReddy #JusticeForPriyankaReddy pic.twitter.com/9vCKsbsj1O
— Keerthy Suresh (@KeerthyOfficial) November 29, 2019