मागच्याच आठवड्यात भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकारांचा हा सर्वौच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात करण जोहर, कंगना राणौत, एकता कपूर, सरीता जोशी, सुरेश वाडकर आणि अदनान सामी यांचा समावेश आहे.
पण बॉलिवूडचा प्रसिध्द निर्माता दिग्दर्शक करण जोहरला त्याला कंगानासोबत पद्मश्री मिळाल्याबद्दल प्रश्न करण्यात आला. तुला याबद्दल काय वाटतंय असं विचारल्यावर करण म्हणतो, " माझ्या आणि कंगनाबद्दल अनेक बातम्या सध्या चर्चेत आहेत. पण आमच्यात तसा अबोला नाही. आम्ही कधीही कुठल्याही कार्यक्रमात भेटलो तरी एकमेकांची नेहमीच विचारपूस करतो. मी एरक फिल्ममेकर आहे आणि कंगनाच्या टॅलेंटचा मी सन्मान करतो. एक अभिनेत्री म्हणून तिने स्वत:ला इंडस्ट्रीत सिध्द केलं आहे. तसंच एकतासोबतही मला पद्मश्री मिळाल्याबद्दल मला फार सन्मानित वाटते.