By  
on  

पहिल्यांदाच करिनाने सांगितली शाहिदसोबतच्या ब्रेकअपची कहाणी

'जब वी मेट'सारखे ते भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या इंडस्ट्रीत चवचवीने चघळल्या जायच्या. पण नंतर असं काही अचानक घडलं की दोघांनी वेगळे मार्ग निवडले आणि आपापला संसार थाटला. तुम्ही बरोबर ओळखलंत. आम्ही बोलतोय, बी टाऊनचं सर्वात चर्चित कपल शाहीद कपूर आणि करिना कपूरबद्दल.

2007 साली इम्तियाज अलीचा 'जब वी मेट' सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या सेटवरुन दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या बातम्या झळकू लागल्या. पुढे त्याचं खरंच ब्रेकअप झालं आणि ते वेगळे झाले. करिनाने बॉलिवूड नवाब सैफ अली खानसोबत विवाहगाठ बांधली तर शाहिदने मीरा राजपूतसोबत लग्न केलं. त्यानंतर दोघंही आपापल्या सुखी संसारात रममाण झाली. नुकत्याच एका मुलाखतीत करिनाने या ब्रेकअपचा पहिल्यांदाच खुलासा केला आहे. 

करिना म्हणते,"नशिबच सर्वकाही ठरवत असतं, त्यापुढे आपल्या हातात काही नसतं, 'जब वी मेट'च्या शूटींगपासून ते टशन सिनेमापर्यंत ब-याच गोष्टी घडल्या. त्यानंतर आम्ही आपापले वेगळे मार्ग निवडले. " ह्यानंतर करिना पुढे सांगते 'जब वी मेट' च्या गीतप्रमाणेच माझं आयुष्य तेव्हा सुरु होतं. त्यावेळेस मला पर्सननल आणि प्रोफेशनल लाईफ सांभाळणं फार कठीण झालं होतं. सिनेमात जसं सेकंड हाफमध्ये गीतचं संपूर्ण आयुष्य बदलतं. तसंच काहीसं माझ्याबाबतीतसुध्दा घडलं." 

'जब वी मेट'  आणि टशन हे दोन्ही सिनेमे करिनाच्या अत्यंत जवळचे आहेत. एक सिनेमा करिनाच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला तर दुस-याने तिला लाईफ पार्टनर दिला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive