By  
on  

'कामयाब' सिनेमा विजू खोटे यांना समर्पित: दिग्दर्शक हार्दिक मेहता

आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते विजू खोटे यांचं अलीकडेच निधन झालं. पण निधनानंतरही ते आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे शक्य झालं आहे कामयाब या सिनेमातून. या सिनेमात एका चरित्र अभिनेत्याची गोष्ट सांगितली आहे. विजू खोटे यांनीही करीअरमध्ये चरित्र अभिनेत्याची भूमिका साकारल्याने हा सिनेमा त्यांच्या जीवनाशी मिळता जुळता आहे. 

 

 

या सिनेमाबाबत बोलताना दिग्दर्शक हार्दिक मेहता म्हणतात, ‘माझी विजू खोटे सरांना भेटण्याची खुप इच्छा होती. लोक आजही त्यांना कालिया या नावाने ओळखतात. या सिनेमासाठी त्यांनी मला खुपच मदत केली. आम्ही हा सिनेमा त्यांना समर्पित केला आहे. खरं तर त्यांनी अनेक सिनेमे केले आहेत. राजकुमार संतोषीच्या प्रत्येक सिनेमात विजू सर असायचेच. त्यांना कोणी एअरपोर्ट दिसलं तरी कालिया म्हणूनच हाक मारायचे. ही बाब त्यांना आनंदादायकही वाटायची आणि वैषम्यही वाटायचं. हा सिनेमा 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive