बॉलिवूडची बेबो करिना कपूर खानचा थाटच न्यारा आहे. सध्या करिना तिच्या आगामी अंग्रेजी मिडीयमच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाचा नायक इरफान खान या प्रोमोशनपासून लांब असल्याने सर्वच भार करिनासह राधिका मदान, दीपक डोब्रियाल यांच्यावरच आहे.
या प्रोमोशन दरम्यानच एका वेबसाईटच्या खास मुलाखतीत करिना कपूरला एक अत्यंत संवेदनशील प्रश्न विचारण्यात आला. लग्नानंतरही आपली अभिनय कारकिर्द सुरु ठेवण्याविषयी करिनाला विचारले की, तु लग्नानंतरही तितकीच सक्रीय आहेस व लोकांचे विवाहीत अभिनेत्रींबद्दलचे विचारसुध्दा बदलले आहेस, काय सांगशील याबाबत.
या प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरं जात करिना उत्तरली, " विवाहीत अभिनेत्री असण्यात काहीच गैर नाहीय आणि आज अनेक दिग्दर्शक यासाठी चांगलं साहाय्य करत आहेत. कबीर खान, आर बाल्की यांसारख्या चांगल्या दिग्दर्शकांसोबत मला लग्नानंतर काम करण्याची संधी मिळाली. बॉलिवूडमध्ये लग्नानंतर अभिनेत्रींना काही किंमत नाही, या फक्त दंतकथा आहेत. आता वेळ खुप बदलला आहे. विद्या बालन, कंगना राणौत सारख्या सशक्त अभिनेत्रींनी नायकाप्रधान सिनेमांची व्याख्याच बदलली आहे. "
हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत करिनाने इरफान खान सोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी सांगितलं. ती म्हणते, मी बॉलिवूडच्या तिन्ही खानसोबत काम केलं आहे. इरफानसोबत काम करण्याची माझी खुप इच्छा होती जी आत्ता अंग्रेजी मिडीयमच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. तो एक शानदार अभिनेता आहे, त्याच्यात एक कमालीची उर्जा आहे.काम करताना खुप मजा आली या सिनेमाच्या टीमचा हिस्सा झाल्याचा मला आनंदच झाला आहे.
(Source: MumbaiMirror/ Hindustan Times)