बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार अन्वर सागर यांचं निधन झालं आहे. मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 80 आणि 90च्या दशकातील अनेक सुपरहिट गाणी त्यांनी लिहली आहेत. अक्षय कुमार आणि आयेशा झुल्कावर चित्रित झालेलं ‘वादा रहा सनम’ हे गाणंही त्यांनीच लिहिलं आहे.
याशिवाय अन्वर यांनी खिलाड़ी', 'कैदी', 'इलाका', 'याराना', 'बेनाम', 'किशन कन्हैया', 'ये जिंदगी का सफर', 'एहसास', 'मासूम तेरा चेहरा', 'नजर के सामने', 'देवता', 'जनता हवलदार', 'तेरी बाते', 'फिल्मी दुनिया' या सिनेमांसाठी दोनशेहून अधिक गाणी लिहिली आहेत.