कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? हा प्रश्न देशभर गाजला होता. फक्त हा प्रश्नच नाही तर या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. एस एस राजमौली यांचं दिग्दर्शन आणि साउथ स्टार प्रभास असलेल्या ‘बाहुबली’ सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरक्षह डोक्यावर घेतलं. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र बाहुबलीच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आणि याच ‘बाहुबली’ सिनेमाला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
या सिनेमातील कलाकारांसह या सिनेमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग असलेल्या कलाकाराने या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेता शरद केळकरने बाहुबलीच्या हिंदी डब वर्जनसाठी आवाज दिला होता. तो बाहुबली बनलेल्या प्रभासचा भारदस्त आवाज होता. आणि हीच आठवण त्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेयर केली आहे.
तो सोशल मिडीयावर लिहीतो की, “बाहुबलीच्या डबिंग सेशन विषयीच्या माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या आयकॉनीक सिनेमाचा भाग असणं आणि प्रभासचा आवाज असणं माझ्यासाठी समाधानकारक होतं. आणि पाच वर्षांनंतरही उत्साह आणि आनंद सारखाच आहे.”
य़ा पोस्टमध्ये शरदने बाहुबली सिनेमाच्या डबिंग सेशनचा फोटोही पोस्ट केला आहे.