तीन मित्रांच्या आंबटगोड यारीदोस्तीवर आधारलेला सिनेमा म्हणजे ‘दिल चाहता है’ . आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने प्रत्येकाला आपला फॅन बनवलं. या सिनेमाने नुकतीच 19 वर्षं पुर्ण केली आहेत. या सिनेमाचा दिग्दर्शक फरहान अख्तरने एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये सिनेमातील काही सीन आहेत जे तुमच्या आठवणी ताज्या करतील.
“१९ वर्षांनंतर.. आकाश, सिद आणि समीर हे तीन मित्र होते, आहेत आणि यापुढेही असतील. आमच्या मैत्रीप्रमाणेच जे क्षण कायम आमच्यासोबत राहतील त्यासाठी हे आहे”. या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबत पटकथेची जबाबदारीही फरहानकडे होती. या सिनेमात मराठमोळी सोनाली कुलकर्णीही झळकली होती. तिच्याशिवाय आमिर खान,अक्षय खन्ना,सैफ अली खान,प्रिती झिंटा आणि डिंपल कपाडिया यांच्या भूमिका होत्या.