जिनं स्वराज्यच्या राजाला घडवलं अशा मुलखावेगळ्या आईची गाथा स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून प्रेक्षकांसमोर उलगडते आहे. जिजाऊंनी कसं शिवबांना घडवलं, त्यांच्यावर कसे संस्कार केले त्यांनी शत्रूंशी कसा लढा दिला. कसा गनिमी कावा खेळत लढत राहिले आणि स्वराज्याचं तोरण बांधलं ही गाथा आणि मराठ्यांचा हा अजोड पराक्रमी इतिहास लहान-थोरांना मालिकेतून पाहायला मिळतेय. डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर स्वराज्यजननी जिजाऊंची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी साकारतायत. स्वराज्यजननी जिजामात या लोकप्रिय मालिकेने नुकताच 400 भागांचा टप्पा ओलांडला आहे.
४०० व्या भागाचं सेलिब्रेशन या मालिकेच्या टीमने जोरदार साजरं केलं. कलाकार, तंत्रज्ञ, इतर पडद्यामागील मंडळी यांनी केक कापून जल्लोष साजरा केला.