By  
on  

आण्णा नाईकांची दहशत पुन्हा वाढणार, शुटिंगचा लवकरच श्रीगणेशा

पाहिल्या दोन भागांच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा भाग येऊ घातला आहे.  करोना प्रतिबंधामुळे या मालिकेचं नवे भाग प्रेक्षकांना पाहता येत नव्हते. पण आता लवकरच या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात होते आहे.लॉकडाऊन, पाऊस या सगळ्यावर मात करत ही मालिका पुन्हा एकदा मनोरंजनासाठी सिद्ध होणार आहे.  ‘लवकरच मालिकेचं शूटिंग सुरु होईल. त्यानंतर लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 

कोकणात सध्या प्रचंड पाऊस सुरु असल्यामुळे पावसाचा व्यत्यय आहेच; पण रात्रीस खेळ चाले हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याची इच्छा आहे. तिसऱ्या पर्वातील गोष्ट काही वर्षांनंतरची आहे. त्यामुळं लोकांना बरेच प्रश्न पडले असतील त्यांची उत्तरं पुढील भागांमध्ये मिळणार आहेत.’
‘कथानक अधिकाधीक गूढ होत जाईल. ज्या अण्णा शेवंताला लोकांनी डोक्यावर घेतलं ते आता भूतांमध्ये सामील झाले आहेत. ते नेमकं काय करणार आहेत? वाड्याची वाटणी होईल का? वाडा विकला जाईल का? या प्रश्नांची उत्तर रंजकपणे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.’ असं प्रल्हाद यावेळी म्हणाले.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive