‘तू सौभाग्यवती हो’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. सुर्यभानच्या रुक्ष स्वभावाशी ऐश्वर्या तिच्या निरागसपणाला अनुसरुन वागताना दिसते आहे. त्यामुळेच अनेकदा ऐश्वर्याकडून अनेकदा कळत नकळत चुका होताना दिसतात. ऐश्वर्याच्या पाठीशी बाईजी खंबीरपणे उभ्या असल्या तरी अनेकदा त्या तिला खडसावतानाही दिसतात.
आताही लहान मुलांसोबत मस्ती करत असताना बाईजी तिला खोलीत घेऊन येतात. ती आता केवळ ऐश्वर्या नाही तर सौभाग्यवती ऐश्वर्या सुर्यभान जाधव असल्याचं बोलतात. वाड्याची मालकीण म्हणून राहण्याची समज तिला बाईजी देतात. यावर ऐश्वर्या त्यांच्याकडे थोडा वेळ मागते. यावर बाईजी त्यांना ट्युमर झाल्याचं सांगतात. त्यामुळे त्यांच्याकडे फार कमी वेळ शिल्लक असल्याचं सांगतात. यावर ऐश्वर्या त्यांना मिळालेली जबाबदारी उत्तम प्रकारे पेलण्याचा शब्द देते.