स्वीटू आणि ओमच्या गोड प्रेम कहाणीला किनार आहे ती नलूच्या द्वेषाची. स्वीटूच्या आईने ओमला हटके अट घातली आहे. ओमला त्याचं संपूर्ण ऐशोआरामाचं घर सोडून स्विटूच्या कुटुंबियांसारखंच १५ दिवस गरिबीत आणि कष्टाने कमवून रहायचं आहे. या वरपरिक्षेत जर ओम यशस्वी झाला तरच साळवी कुटुंबाच्या लेकीचा हात त्याच्या हातात देण्यात येणार आहे. ओम या कठीण परिक्षेत यशस्वी होत स्वीटूचं प्रेम मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
ओमने पैसे जमवण्यासाठी भाजी विकायला सुरुवात केली आहे. पण त्याच्या प्लॅनमध्ये अडथळा आहे तो मोहितचा. मोहीतने गुंड पाठवून ओमचा भाजी स्टॉल उध्वस्त केला आहे. अशा वेळी ओम पुन्हा कसा उभा राहतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.