By  
on  

मानस-वैदही अडकले विवाहबंधनात; पण शुभकार्यात पडला मिठाचा खडा

तरुणाईची लाडकी मालिका ‘फुलपाखरु’मधील मानस आणि वैदही याचं नुकतंच लग्न थाटात पार पडलं आहे. मोठ्या शानदार पध्दतीने दोघांचा लग्न सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मानस आणि वैदही दोघेही खुपच सुंदर आणि खुलून दिसत होते. यावेळी आपल्या खास दोस्तांच्या लग्नासाठी त्यांचा संपूर्ण ग्रुपने जय्यत तयारी केली होती. सर्वचजण छान नटून-थटून वावरत होते. सर्वांनी भरपूर धम्माल केली. यावेळी मानसचे बॉस शीतल सर आणि त्यांच्या मिसेस यांनीसुध्दा विशेष हजेरी लावत, घरचं कार्य असल्याप्रमाणे मदत केली. सर्वच जण मस्त आनंदात आहेत. मानसचे आई-बाबा तर वैदहीचे बाबा आणि भाऊ यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

म्हणतात ना कुठल्याही कार्यात मीठाचा खडा हा पडतोच, एकीकडे मायामुळे मानस- वैदहीला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. तरीसुध्दा ती या दोघांचा पाठलाग करणं काही सोडत नाही. मेहंदी, संगीत, व्याही-भोजन, हळद असे सर्व लग्नाचे कार्यक्रम साग्रसंगीत पार पडले, मात्र लग्नघटिका जवळ आली असताना मानसच्या कुसूम आत्याचा नवरा ऐनवेळी तिथे येतो आणि वैदहीच्या वडिलांवर मोठमोठ्याने ताशेरे ओठू लागतो, त्यामुळे संपूर्ण आनंददायी वातावरणात एकप्रकारे मीठाचा खडा पडतो. पण वैदही मात्र आपल्या वडिलांच्या बाजूने ठाम उभी राहते व त्यांना प्रत्युत्तर देते.

पुढे नेमकं काय घडणार आहे, मानस वैदहीला कशी साथ देणार, या प्रसंगाला हे नवपरिणीत दाम्पत्य कसं सामोरं जाईल आणि मालिकेत कुठलं नवं वळण येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहात राहा, ‘फुलपाखरु’ मालिका झी युवा वाहिनीवर सोम-शुक्र संध्याकाळी 7.30 वा.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive