By  
on  

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा येणार का?

रहस्य मालिकांचा किंवा हॉरॉर मालिकांचा स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग असतो. पण झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने मात्र सर्व स्तरातील प्रेक्षकांना रहस्य मालिकांकडे वळण्यास भाग पाडलं.

कोकणातील निसर्गरम्य लोकेशनवर चित्रित झालेल्या या मालिकेचा टीआरपी काही भागांनंतर चांगलाच वाढला होता. उत्कंठा वाढवणारं कथानक आणि अंगावर शहारा आणणारं पार्श्वसंगीत यामुळे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेतील आये, सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम, विश्वासराव या आणि इतर अनेक पात्रांनी लोकांची वाहवा मिळवली.

या मालिकेने पहिल्या सत्रात दोनशे भाग पूर्ण केले होते. पण या मालिकेला मिळालेलं यश पाहता, झी नेही मालिका परत आणण्याचं ठरवलं आहे. झी च्या ट्विटर हॅंड्लवर एक व्हिडिओ रिलिज करण्यात आला आहे. यावरुन प्रेक्षकांनी रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा सुरु होतीये असं अनुमान लावलं आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1071785308834807809

Recommended

PeepingMoon Exclusive