सुंदरा मनामध्ये भरली ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेतील अभिमन्यू आणि लतिका यांच्यातील द्वेष, वाद आणि आता फुललेलं प्रेम असा मनोरंजक प्रवास रसिकांना अनुभवता आला आहे.
अल्पावधितच ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली.
गेल्या काही दिवसांपासून अभि-लतिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले.
बापूंना तर अभि-लतिचं नातंच मान्य नव्हतं.
आधी एकमेकांचीसोबत नकोशी वाटणारे अभि-लति आता एकमेकांशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत.
सोशल मिडीयावर सध्या अभि-लतिच्या लग्नाच्या फोटोंनी एकच धुमाकूळ घातलाय.